Saturday, 6 November 2010
बोगस फटाके वितरकाला अटक
Thursday, 14 October 2010
हुश्श...
Tuesday, 13 July 2010
कोणे एके काळी...
Sunday, 27 June 2010
माझी कथा लोकसत्तात !
Tuesday, 15 June 2010
भवानी तलवार
तर तो प्रसंग असा आहे:
दिनकर भोसले हा कथानायक, 'गोसालिया' या दुष्ट पात्रावर तलवार उगारून उभा असतो. आपल्याला वाटतं आता तलवारीचा वार होणार. पण दिनकर भोसले म्हणतो,
"महाराजांनी दिलेल्या तलवारीनं तुझ्यासारख्या भेकड आणि नीच माणसाचा खून करणार नाहीए मी"

म्हणजे ?? नीच माणसावर तलवार चालवायची नाही तर काय सज्जनांना कापून काढायचं ? !!
शिवाजी महराजांनी ज्या मोगल नि इतर लोकांना वर (इथे मी 'खाली' लिहिणार होतो, पण ज्याला युद्धात मरण येतं तो स्वर्गात जातो असं ऐकलय) पाठवलं ती लोकं नीचच होते की नाही. मग...
Monday, 17 May 2010
अचाट मोदी

सॉलिड बातमी होती आज सगळ्या पेपरांत. BCCI च्या 'कारणे दाखवा' नोटीसला मोदी यांनी बारा हजार पानी उत्तर दिले. खरंच अचाट ईसम आहे हा मोदी ! ३५ पानांच्या नोटीसला एवढं मोठं उत्तर ? इकडे मराठीच्या तासाला संदर्भासाहित स्पष्टीकरणाला १०-१२ ओळी लिहिताना आमची बोंबाबोंब व्हायची अन् हे बेणं पाठवतंय खोकिच्या खोकी भरून उत्तर !
आता केकता कपूर--सॉरी--एकता कपूरला नवीन सीरियल सुरू करण्याची नामी संधी आहे. 'कहानी क्रिकेट किंग की' (यातल्या क्रिकेटचं स्पेलिंग 'Kricket' बरं का) या नावाने सीरियल जाहीर करायची आणि त्यात ललित मोदींची 'छोटिशी' मुलाखत घ्यायची. १२००० हजार पानी उत्तरं देण्याची सवय असणार्या मोदींची ती मुलाखत रोज डेली सोपच्या धर्तीवर दाखवल्यास किती दिवस सुरू राहील याचा हिशोब करा !
बाकी ते उत्तर खरंच एवढं मोठं नसणार. मजकुराची लांबी वाढवायची ती जुनीच आयडिया आहे. त्यात लिहिलं असेल, "आम्ही बॉल खरेदी केले. त्याची क्वालिटी तपासण्यासाठी त्याचे टप्पे पाडून पाहिले. टप्पे असे पडले--टप टप टप टप....टप टप टप टप.....टप टप टप टप.....टप टप टप टप.....एन्"
बरोबर ना ?
Saturday, 15 May 2010
फाजिती
मग प्रत्येक पोस्ट नंतर काउंटर वर वाढत जाणार्या संख्येकडे पाहायला अभिमान वाटायचा. आपलं लिखाण (खूपच पांचट असूनही) कोणीतरी वाचतय ही गोष्ट मनाला सुखवायची. त्या काउंटर चा 'अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा' होताना पाहायची उत्सुकता होती.
आणि एके दिवशी घात झाला. फ्री काउंटरवाल्यांना कसे कोण जाणे माझी लबाडी समजली. त्या दुर्दैवी सकाळी ब्लॉग पहिला तर काउंटर दिसेना. त्या जागी Account Suspended. No Link Found असा रूक्ष मेसेज !
मग आज परत काउंटर लावायचा ठरवलाय. ब्लॉग वर अतपर्यंतच्या नोंदी आहेत १७ (अरेरे! एवढ्याच ?). म्हणजे एका नोंदीला किमान तीस जणांनी भेटी दिल्या असं म्हटलं तर संख्या होते सतरा त्रिक चोपन्न-नव्हे-एक्कावन वर एक शून्य = ५१०. आणि आधीच्या काउंटर ने ५०० चा आकडा क्रॉस केलेला नक्की आठवतोय. सो आता हा काउंटर ५१० पासूनच सुरू करतो.
Thursday, 13 May 2010
बावळट प्रश्न आणि हुशार उत्तर !
Wednesday, 5 May 2010
Orkut वरील 'मराठी विनोद' कम्युनिटी
Monday, 3 May 2010
उड जावे चिडिया भुर्रर...
"अरे काल काय झाल रे ? मला काहीच आठवत नाही" तळीराम म्हणाला.
त्याचा मित्र सांगू लागला,
"अरे, काल आपण सगळे त्या पक्याच्या घरी टेरेस वर पीत बसलो नव्हतो का... तेव्हा तू म्हणालास आता मी चिमणीसारखा भुर्रर उडून जातो...आणि उडी मारलीस..."
"मूर्खा, मग मला थांबवायच होतस ना !" तळीराम डाफरला.
"पण मला तेव्हा वाटलं तू सहज उडत जाशील म्हणून..."
Sunday, 2 May 2010
चायनीज ??
वेळ : अशीच.....निवांत.
पात्रे : दोन मनुष्य.

मनुष्य क्रमांक एक : तुम्ही चायनीज आहात का हो ?
मनुष्य क्रमांक दोन : नाही. इथलाच आहे मी.
(थोड्या वेळाने)
मनुष्य क्रमांक एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
मनुष्य क्रमांक दोन : (त्रासून) सांगितल ना एकदा...नाही.
(परत थोड्या वेळाने)
म.क्र. एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
म.क्र. दोन : (रागावून) अहो काय हे.......नाहीए मी चायनीज किती वेळा सांगू ??
(परत अजुन थोड्या वेळाने)
म.क्र. एक : खरं सांगा.....चायनीज आहात ना ?
म.क्र. दोन : (किंचाळून) हो....आहे मी चायनीज. बोला....
म.क्र. एक : काहीतरीच सांगताय.....चायनीज म्हणे.....चेहे-यावरून अजिबात वाटत नाही !!
Monday, 25 January 2010
हॅपी प्रजासत्ताक दिन

Tuesday, 19 January 2010
प्रेम त्रिकोण
ते दोघे लहानपणापासून चे मित्र होते. 'ते' म्हणजे राजू आणि विजू. एकत्र अभ्यास केला......एकत्र नापास झाले.....आपापल्या घरी एकाच वेळी ओरडा खाल्ला....मग एकत्र मन लावून अभ्यास केला.....एकत्र पास झाले. दोघांना अभ्यासाची गोडी लागली. दोघांना चांगले मार्क्स पडू लागले. ही मुले दहावीत नाव काढणार असं सगळे म्हणू लागले. आणि तसच झालं दोघांनाही चांगले टक्के पडले. साहजिकच शास्त्र शाखेकडे दोघे वळले. इथपासून दोघांचे मार्ग भिन्न होवू लागले. राजू ला आवड होती गणिताची....तर विजू जीवशास्त्रात रमे.
त्यामुळे राजू ने बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर विजू ने वैद्यकिय महाविद्यालयात. तरीही मैत्री काही तोडली नाही. यथावकाश त्यांनी आपापले अभ्यासक्रम पूर्ण केले.
दरम्यान त्यांच्या परिसरात एक तरुणी राहायला आली. लहान पणापासून सगळ्या गोष्टींचा एकत्र अनुभव घेतलेल्या राजू आणि विजू ला तिच्या प्रेमात पडायला वेळ लागला नाही. दोघांनाही तीच तरुणी आवडायची. दोघांनी तिच्याशी मैत्री केली. आता मात्र ते दोघे मित्र राहीले नाहीत. नेहमी एकीमेकांवर मात कशी करता येईल हे ते बघत.एकदा काही कामानिमित्त राजू ला आठवडाभर बाहेर जायचे होते. तर त्याने त्या तरुणीला चक्क सात सफरचंद दिले आणि गेला.
वाचक हो, कोणी कल्पना करू शकेल असं अचाट गिफ्ट त्याने का दिलं असावं ?
अहो, विजू ला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी ! AN APPLE A DAY, KEEPS DOCTOR AWAY !!!